prafulla phadke mhantat

Tuesday, November 13, 2018

नामांतराचे राजकारण

सध्या देशात नामांतराचे वेध प्रत्येक पक्ष संघटनांना लागलेले आहेत. आपली ताकद दाखवण्यासाठी वेगवेगळी शहरे, रेल्वे स्थानके यांना नवी नावे काय असावीत, याबाबत एक चढाओढ लागलेली दिसते. थोडक्यात, आपले अस्तित्व दाखवण्यासाठी असे राजकारण सुरू झाले आहे. हे थोडेफार हास्यास्पद होताना दिसते आहे. उत्तर प्रदेशात फैजाबादचे अयोध्या झाले. अर्थात अयोध्या हे पुराणकालापासून सुरू असलेले आणि परिचित असलेले नाव आहे. अवध किंवा अयोध्या हे पूर्वीपासूनचे नाव होते. मोगल राजवटीत त्याची तोडमोड होऊन फैजाबाद झाले होते. त्यामुळे ते नाव बदलले गेले म्हणण्यापेक्षा मूळ नाव त्या शहराला दिले गेले. गदिमांनीही आपल्या गीतरामायणात शरयू तीरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी असेच वर्णन केलेले होते. तसेच सर्वच रामायण आणि पुराणकाळात तेच नाव प्रस्थापित होते. त्यामुळे हे नाव बदलले नाही, तर मूळचे नाव दिले गेले आहे. अलाहबादचे प्रयागराज झाले, तेही पूर्वीपासून त्याचा पुराणाशी संबंध आहे. इतिहासाशी संबंध आहे. काशीयात्रा, प्रयागयात्रा अशी त्रिस्थळी यात्रा करण्याची आपली परंपरा आहे.त्यामुळे प्रयागला जाण्याची परंपरा असल्यामुळे त्याचे नंतर मोगल राजवटीत अलाहाबाद नाव केले गेले. ते बदलून त्याला मूळचे असलेले प्रयागराज नाव दिले गेले. यापूर्वीही अनेक नावे अपभ्रंश होऊन वापरली जात होती. त्यापैकी मुंबईचा अपभ्रंश करून बंबई, बॉम्बे असे म्हटले जात होते. उत्तर भारतीयांनी त्याला बंबई करून चित्रपटसृष्टीमुळे ते अधिकच गाजले. मै बंबई का बाबू, बॉम्बे टू गोवा, सलाम बॉम्बे, इहै बंबै नगरिया को देख बबुआ, अशा बॉलिवूडमधील वर्णनांनी सुंदर मुंबईची बंबई झाली. त्या मुंबईला तिचे मूळचे नाव मिळवून दिले. दक्षिणेतही मद्रास या तामिळनाडूच्या राजधानीचे नाव असेच काही वर्षापूर्वी बदलले गेले. ते चेन्नई केले गेले. त्या त्या शहरांना त्यांचे मूळ नाव मिळवून दिले गेले. प. बंगालमध्येही वर्षानुवर्षे कलकत्ता नावाने ओळखल्या जाणा-या शहराला बंगाली भाषेच्या पार्श्वभूमीवर कोलकाता असे करण्यात आले. जी नावे बदलली गेली, त्यांना काही ऐतिहासिक वारसा आणि दाखले आहेत म्हणून ती बदलली गेली; परंतु ही नावे बदलली म्हणून आणखी काही नावे बदला, अशा मागण्यांची चढाओढ सुरू झाली. हा अगदी पोरकटपणा म्हणावा लागेल. हातात काही कामे नाहीत म्हणून अशी मागणी करण्याचा सपाटा लावला जात आहे. हे नामांतराचे राजकारण थांबवले पाहिजे.काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष, संघटना तर या नामांतराचा खेळ करून राजकारण करताना दिसतात. त्यामध्ये आपण आपल्या आदरणीय व्यक्तिमत्त्वांचा, आदर्शाचा अपमान करून त्यांना संकुचित करतो आहोत, हे ध्यानात घेतले पाहिजे. औरंगाबाद या शहराचे नाव संभाजीनगर करावे, ही मागणी अनेक वर्षाची आहे. ना काँग्रेसच्या काळात त्याची दखल घेतली गेली, ना युतीच्या काळात अजूनही त्याचे नाव बदलले गेले. केवळ एका पक्षाने, शिवसेनेसारख्या संघटनेने त्याचा उल्लेख संभाजीनगर केल्याने औरंगाबादचे नामांतर झाले असे म्हणता येत नाही. त्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न होणे अपेक्षित आहे. शिवसेनेने सत्तेत असूनही तशी कधीच मागणी केली नाही, की त्यासाठी प्रयत्न केले नाहीत. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथांनी फटाफट निर्णय घेतलेसुद्धा. पण, शिवसेनेच्या निष्क्रियतेमुळे औरंगाबादचा मुद्दा मात्र लांब पडताना दिसत आहे. तसे प्रयत्न दिसत नाहीत. त्यामुळे फक्त नामांतराचे राजकारण करून चर्चेत राहण्याचा शिवसेनेचा प्रयत्न दिसतो आहे. हे कमी म्हणून की काय त्याच धरतीवर पुण्याचे नावही जिजापूर करावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने राज्य सरकारला करण्यात आली आहे. पुणे हे शहर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई यांनी वसवले असल्यामुळे त्यांचेच नाव या शहराला द्यावे, असे ब्रिगेडच्या नेत्यांचे म्हणणे आहे.१७व्या शतकात पुण्यावरून गाढवाचा नांगर फिरवण्यात आला होता. पुणे शहर पूर्णपणे बेचिराख झाले होते. तेव्हा छत्रपती शिवराय यांच्या मातोश्री जिजामाता यांनी या पुण्याला नवसंजीवनी दिली. राखेतून शहर उभारले. या कारणामुळेच पुणे शहराचे नाव जिजामातांच्या नावावर असावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने संतोष शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सत्तेत आले. आता त्यांचा मान राखून पुण्याचेही नाव जिजापूर करावे, असे संतोष शिंदे यांचे म्हणणे आहे. या भावना कितीही चांगल्या असल्या, तरी पुणे पुनवडी हे नाव जिजाऊंनीच वसवले होते. त्यामुळे त्यांनीच वसवलेल्या शहराचे नाव बदलणे, हाही जिजाऊंचा अपमानच होईल असे वाटते. त्या थोर राजमातांना पुण्यापुरते मर्यादित करण्याची गरज नाही. त्यांनी वसवलेल्या पुणे शहराचे नाव बदलण्याची गरज नाही. केवळ राजकारणासाठी चर्चेत राहण्यासाठी असे मुद्दे घेऊन आपल्या आदरस्थानांची उंची कमी करण्याचा प्रयत्न करू नये. त्याचप्रमाणे उस्मानाबादचे नाव धाराशिव करावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेड अनेक वर्षे करते आहे. ही मागणी रास्त आहे. त्याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होणे गरजेचे आहेत; परंतु या नामांतराच्या नव्या चळवळीत किंवा चुळबुळीत नवे राजकारण होताना दिसत आहे.आता काँग्रेसचे काही विद्वान नेते सगळे मुद्दे संपले आणि देशापुढचे सगळे प्रश्न सुटले म्हणून पारावरच्या वायफळ चर्चा असतात, तशा नामांतराच्या चर्चा करताना दिसतात. यात म्हणे शाह हा शब्द पार्शी असल्याने अमित शाहांचे नावही बदला, असले आचरट सल्ले कोणी देताना दिसतो आहे. हे अगदी खालच्या पातळीवरचे राजकारण होताना दिसते आहे. नावे बदलूनही किती लोक त्याचा वापर करतात, हा प्रश्न वेगळाच आहे. व्हीटीचे नाव छत्रपती शिवाजी टर्मिनस केले, त्यानंतर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे गेल्या वर्षी केले गेले. तरीही अजून अनेक महाभाग व्हीटीचेच तिकीट मागतात. सीएसटी आणि सीएसएमटी या नावावरून महाराजांच्या नावाचा कुठेही जयजयकार होताना दिसत नाही. त्यामुळे नामांतराची राजकारणे न करता, त्याचा योग्य उच्चार होऊन सन्मान कसा होईल, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
at November 13, 2018
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

No comments:

Post a Comment

Newer Post Older Post Home
Subscribe to: Post Comments (Atom)

Contributors

  • Dare | Dream
  • prafulla phadke mhantat

Blog Archive

  • ►  2026 (342)
    • ►  July (22)
    • ►  June (57)
    • ►  May (60)
    • ►  April (42)
    • ►  March (52)
    • ►  February (51)
    • ►  January (58)
  • ►  2025 (541)
    • ►  December (56)
    • ►  November (52)
    • ►  October (54)
    • ►  September (1)
    • ►  August (46)
    • ►  July (62)
    • ►  June (59)
    • ►  May (49)
    • ►  April (43)
    • ►  March (36)
    • ►  February (38)
    • ►  January (45)
  • ►  2024 (1)
    • ►  November (1)
  • ►  2022 (227)
    • ►  May (15)
    • ►  April (52)
    • ►  March (48)
    • ►  February (54)
    • ►  January (58)
  • ►  2021 (510)
    • ►  October (8)
    • ►  September (38)
    • ►  August (49)
    • ►  July (62)
    • ►  June (61)
    • ►  May (56)
    • ►  April (60)
    • ►  March (60)
    • ►  February (56)
    • ►  January (60)
  • ►  2020 (427)
    • ►  December (59)
    • ►  November (15)
    • ►  October (16)
    • ►  September (53)
    • ►  August (35)
    • ►  July (59)
    • ►  June (48)
    • ►  May (51)
    • ►  March (24)
    • ►  February (34)
    • ►  January (33)
  • ►  2019 (109)
    • ►  December (45)
    • ►  November (11)
    • ►  April (2)
    • ►  March (9)
    • ►  February (17)
    • ►  January (25)
  • ▼  2018 (387)
    • ►  December (26)
    • ▼  November (30)
      • ग्राहकांवर बोजा नको
      • ‘वजनदार’ शिक्षणपद्धतीला चाप
      • अधिभार की जिझिया कर?
      • शिक्षणातील अडथळ्य़ांची शर्यत
      • मुंबई तुला सलाम!
      • अनुभव समृद्ध राजकारणी यशवंतराव चव्हाण
      • राम का नाम बदनाम ना करो।
      • याचे अनुकरण नको!
      • सरकारची लिव्ह अँड रिलेशनशीप
      • सरकारचे आर्थिक धोरण संशयास्पद
      • शिवसेनेला चपराक
      • शेतक-यांच्या प्रश्नात राजकारण नको
      • महापालिकेच्या निष्क्रियतेवर न्यायालयीन हातोडा
      • सिंह, बैल आणि कोल्ह्याची गोष्ट
      • मुंबई महापालिकेचा नियोजनशून्य कारभार
      • आता अंत नका पाहू!
      • नक्षलवादाचा राजकीय फायदा
      • शिवसेनेचा आततायीपणा
      • आराम हराम है।
      • नामांतराचे राजकारण
      • काँग़्रेस जाहीरनाम्यातच फसली
      • भाजपचे शक्तिप्रदर्शन
      • पुतळ्याची उंची, काँग्रेसची गोची
      • बचाओ.. पण कोणाला?
      • दिवाळीवर दुष्काळाचे सावट
      • कन्नड पोलिसांचा महाराष्ट्रद्वेष
      • महाराष्ट्राची इच्छाशक्ती कमी पडते?
      • संरक्षण घोटाळ्यांची परंपरा
      • राजेशाही अजून डोक्यातच आहे!
      • योग्य निवड
    • ►  October (26)
    • ►  September (20)
    • ►  August (28)
    • ►  July (32)
    • ►  June (35)
    • ►  May (39)
    • ►  April (35)
    • ►  March (38)
    • ►  February (53)
    • ►  January (25)
  • ►  2017 (31)
    • ►  November (1)
    • ►  October (1)
    • ►  August (11)
    • ►  July (2)
    • ►  May (1)
    • ►  April (1)
    • ►  March (4)
    • ►  February (10)
  • ►  2016 (232)
    • ►  September (1)
    • ►  August (25)
    • ►  July (19)
    • ►  June (26)
    • ►  May (29)
    • ►  April (30)
    • ►  March (31)
    • ►  February (29)
    • ►  January (42)
  • ►  2015 (165)
    • ►  December (23)
    • ►  November (22)
    • ►  September (2)
    • ►  August (36)
    • ►  July (33)
    • ►  June (12)
    • ►  February (13)
    • ►  January (24)
  • ►  2014 (206)
    • ►  December (28)
    • ►  November (25)
    • ►  October (9)
    • ►  September (4)
    • ►  July (12)
    • ►  June (23)
    • ►  May (20)
    • ►  April (85)
  • ►  2013 (1)
    • ►  June (1)
  • ►  2011 (2)
    • ►  September (1)
    • ►  August (1)
  • ►  2010 (4)
    • ►  September (1)
    • ►  August (1)
    • ►  March (2)

Labels

  • uttam nirnay
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • संपादकीय

Report Abuse

facebook

Posts
Atom
Posts
Comments
Atom
Comments

prafulla phadke mhantat: दादा, साडेबारा टक्केच्या फलाटाचे बोलाल का?

Prafulla Phadke

Create Your Badge

Facebook Badge

Prafulla Phadke

Create Your Badge

फॉलोअर

Subscribe To

Posts
Atom
Posts
Comments
Atom
Comments

Search This Blog

Pages

  • Home

Featured Post

दहशतवाद्यांचे उदात्तीकरण चुकीचेच

कुख्यात कम्युनिस्ट हुकूमशहा जोसेफ स्टॅलिन एका मुलाखतीत म्हणाले होते की, शिक्षण हे एक शस्त्र आहे, ज्याची परिणामकारकता ते कोणाच्या हातात आहे आ...

Total Pageviews

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!

Top Videos

megagrid/recent
Your Responsive Ads code (Google Ads)
Your Responsive Ads code (Google Ads)

Trending Weekly

4/sgrid/recent

Most Recent

4/sidebar/recent

Social Plugin

  • facebook
  • twitter
  • whatsapp
  • reddit
  • pinterest
  • vk
  • instagram
  • youtube

प्रफुल्ल फडके याचा ब्लॉग

बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा. संपादक - +919152448055

Top Stories

megagrid/recent
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy
  • Term & Conditions
  • Disclaimer
  • DMCA
  • Sitemap

Follow Us

Contact form

Processors Info

Processors Info

राजकारण

राजकारण

क्राईम

क्राईम

देश-विदेश

देश-विदेश

संपादकीय

संपादकीय

मनोरंजन

मनोरंजन

धाराशिव

धाराशिव

महाराष्ट्र

महाराष्ट्र

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

Footer Copyright

Design by - Dainik Trishakti | Distributed by Orbit Digital
prafulla phadke mhantat

About Us

प्रफुल्ल फडके हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि समकालीन विषयांवर अभ्यासपूर्ण लेखन करणारे संवेदनशील लेखक व ब्लॉग लेखक आहेत. त्यांच्या लेखणीतून समाजातील घडामोडी, लोकहिताचे प्रश्न, प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे आणि सकारात्मक विचार वाचकांपर्यंत पोहोचतात.
  • मुख्य पान
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • आणखी
  • Home
  • About
  • Contact us
  • Privacy Policy

What's New

 कठीण समय येता कोण कामास येतो?

कठीण समय येता कोण कामास येतो?

 कोल्हटकरी नाटके

कोल्हटकरी नाटके

 विच्छा माझी पुरी करा

विच्छा माझी पुरी करा

 ‘आत्मनिवेदन’ भक्तीचे पदर

‘आत्मनिवेदन’ भक्तीचे पदर

महंताचे आचरण कसे असावे

महंताचे आचरण कसे असावे

शुद्ध ज्ञान निरूपण या समासात उपनिषदातील महावाक्यांचा अभ्यास

शुद्ध ज्ञान निरूपण या समासात उपनिषदातील महावाक्यांचा अभ्यास

गुरू आणि सदगुरू यातील फरक

गुरू आणि सदगुरू यातील फरक

श्रवणभक्ती’ व ‘कीर्तनभक्ती’ या एकमेकांवर आधारित

श्रवणभक्ती’ व ‘कीर्तनभक्ती’ या एकमेकांवर आधारित

                                     संसारातील टोमणे

संसारातील टोमणे

‘पादसेवन भक्ती’

‘पादसेवन भक्ती’

ताज्या बातम्या

 कठीण समय येता कोण कामास येतो?

कठीण समय येता कोण कामास येतो?

 कोल्हटकरी नाटके

कोल्हटकरी नाटके

 विच्छा माझी पुरी करा

विच्छा माझी पुरी करा

 ‘आत्मनिवेदन’ भक्तीचे पदर

‘आत्मनिवेदन’ भक्तीचे पदर

महंताचे आचरण कसे असावे

महंताचे आचरण कसे असावे

शुद्ध ज्ञान निरूपण या समासात उपनिषदातील महावाक्यांचा अभ्यास

शुद्ध ज्ञान निरूपण या समासात उपनिषदातील महावाक्यांचा अभ्यास

गुरू आणि सदगुरू यातील फरक

गुरू आणि सदगुरू यातील फरक

श्रवणभक्ती’ व ‘कीर्तनभक्ती’ या एकमेकांवर आधारित

श्रवणभक्ती’ व ‘कीर्तनभक्ती’ या एकमेकांवर आधारित

                                     संसारातील टोमणे

संसारातील टोमणे

‘पादसेवन भक्ती’

‘पादसेवन भक्ती’

Popular Posts

  • कठीण समय येता कोण कामास येतो?
    तदितर खग भेणे वेगळाले पळाले।  उपवन-जल-केली, जे कराया मिळाले।। स्वजन गवसला जो, त्याचपाशी नसे तो।  कठिण समय येता कोण कामास येतो।। अशी एक बालभा...
  • कोल्हटकरी नाटके
    मराठी रंगभूमीच्या इतिहासात नाटककार बाळ कोल्हटकर यांच्या नावाचे एक सुवर्णपान आहे. महाराष्ट्राचा छोटा गडकरी म्हणून ओळखल्या जाणाºया बाळ कोल्हटक...
  • विच्छा माझी पुरी करा
    एकेकाळी तमाशा, वगनाट्य हे ग्रामीण आणि असभ्य कलाप्रकार आहेत अशी शहरी समाजाची विचारसरणी होती. परंतु ‘विच्छा माझी पुरी करा’ या नाटकाने ही विचार...

Labels

  • uttam nirnay
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • संपादकीय

Blog Archive

  • ►  2026 (342)
    • ►  July (22)
    • ►  June (57)
    • ►  May (60)
    • ►  April (42)
    • ►  March (52)
    • ►  February (51)
    • ►  January (58)
  • ►  2025 (541)
    • ►  December (56)
    • ►  November (52)
    • ►  October (54)
    • ►  September (1)
    • ►  August (46)
    • ►  July (62)
    • ►  June (59)
    • ►  May (49)
    • ►  April (43)
    • ►  March (36)
    • ►  February (38)
    • ►  January (45)
  • ►  2024 (1)
    • ►  November (1)
  • ►  2022 (227)
    • ►  May (15)
    • ►  April (52)
    • ►  March (48)
    • ►  February (54)
    • ►  January (58)
  • ►  2021 (510)
    • ►  October (8)
    • ►  September (38)
    • ►  August (49)
    • ►  July (62)
    • ►  June (61)
    • ►  May (56)
    • ►  April (60)
    • ►  March (60)
    • ►  February (56)
    • ►  January (60)
  • ►  2020 (427)
    • ►  December (59)
    • ►  November (15)
    • ►  October (16)
    • ►  September (53)
    • ►  August (35)
    • ►  July (59)
    • ►  June (48)
    • ►  May (51)
    • ►  March (24)
    • ►  February (34)
    • ►  January (33)
  • ►  2019 (109)
    • ►  December (45)
    • ►  November (11)
    • ►  April (2)
    • ►  March (9)
    • ►  February (17)
    • ►  January (25)
  • ▼  2018 (387)
    • ►  December (26)
    • ▼  November (30)
      • ग्राहकांवर बोजा नको
      • ‘वजनदार’ शिक्षणपद्धतीला चाप
      • अधिभार की जिझिया कर?
      • शिक्षणातील अडथळ्य़ांची शर्यत
      • मुंबई तुला सलाम!
      • अनुभव समृद्ध राजकारणी यशवंतराव चव्हाण
      • राम का नाम बदनाम ना करो।
      • याचे अनुकरण नको!
      • सरकारची लिव्ह अँड रिलेशनशीप
      • सरकारचे आर्थिक धोरण संशयास्पद
      • शिवसेनेला चपराक
      • शेतक-यांच्या प्रश्नात राजकारण नको
      • महापालिकेच्या निष्क्रियतेवर न्यायालयीन हातोडा
      • सिंह, बैल आणि कोल्ह्याची गोष्ट
      • मुंबई महापालिकेचा नियोजनशून्य कारभार
      • आता अंत नका पाहू!
      • नक्षलवादाचा राजकीय फायदा
      • शिवसेनेचा आततायीपणा
      • आराम हराम है।
      • नामांतराचे राजकारण
      • काँग़्रेस जाहीरनाम्यातच फसली
      • भाजपचे शक्तिप्रदर्शन
      • पुतळ्याची उंची, काँग्रेसची गोची
      • बचाओ.. पण कोणाला?
      • दिवाळीवर दुष्काळाचे सावट
      • कन्नड पोलिसांचा महाराष्ट्रद्वेष
      • महाराष्ट्राची इच्छाशक्ती कमी पडते?
      • संरक्षण घोटाळ्यांची परंपरा
      • राजेशाही अजून डोक्यातच आहे!
      • योग्य निवड
    • ►  October (26)
    • ►  September (20)
    • ►  August (28)
    • ►  July (32)
    • ►  June (35)
    • ►  May (39)
    • ►  April (35)
    • ►  March (38)
    • ►  February (53)
    • ►  January (25)
  • ►  2017 (31)
    • ►  November (1)
    • ►  October (1)
    • ►  August (11)
    • ►  July (2)
    • ►  May (1)
    • ►  April (1)
    • ►  March (4)
    • ►  February (10)
  • ►  2016 (232)
    • ►  September (1)
    • ►  August (25)
    • ►  July (19)
    • ►  June (26)
    • ►  May (29)
    • ►  April (30)
    • ►  March (31)
    • ►  February (29)
    • ►  January (42)
  • ►  2015 (165)
    • ►  December (23)
    • ►  November (22)
    • ►  September (2)
    • ►  August (36)
    • ►  July (33)
    • ►  June (12)
    • ►  February (13)
    • ►  January (24)
  • ►  2014 (206)
    • ►  December (28)
    • ►  November (25)
    • ►  October (9)
    • ►  September (4)
    • ►  July (12)
    • ►  June (23)
    • ►  May (20)
    • ►  April (85)
  • ►  2013 (1)
    • ►  June (1)
  • ►  2011 (2)
    • ►  September (1)
    • ►  August (1)
  • ►  2010 (4)
    • ►  September (1)
    • ►  August (1)
    • ►  March (2)

फॉलोअर

Powered by Blogger.